Sunday, January 27, 2013

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात

काहीच सुचेना. काहीच होईना. नन्नाचा पाढा सोडला तर बाकी काहीच येईना. टीवी वर बघाव तर मतं मांडायला भुकेली माणसं. Cameraman नं "ACTION" म्हणालं की लगेच समोर एकच भाकर आहे समजून तुटून पडतात. घटनेचे भुकेले news channels. बाहेर मेणबत्त्यांचा जमाना. कृतकृत्य व्हायचा कीवा जागृत नागरिक असल्याचा स्वतःला पुरावा द्यायची गरज वाटली की लगेच घ्यायची मेणबत्ती हातात आणि सुटायच! कधीकधी वाटतं की कारणही बघायची गरज लागणार नाही काही दिवसात. असाच बाहेर पडायचं हातात मेणबत्ती घेऊन, बघणारा आपापल्या सोयीनं अर्थ लावून घेईल. कीवा कधी कधी घरात कोणी ऐकेना म्हणून पण मिनी-मेणबत्ती मोर्चा पण निघेल. बेडरूम पासून हॉल पर्यंत. रस्त्यावरून जावं तर सगळेच असंतुष्ठ. काळा गॉगल लावून रस्त्याच्या कोपऱ्या कोपऱ्यावर टांगलेल्या फोटो मधून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे घेणारे सोडले तर, बाकीचे कोणच खुश दिसत नाही. ते फोतोमाढले पण का एवढे खुश असतात कळत नाहीच. पण तरीही मी खुश नाही आणि ते कसे काय खुश? म्हणून कदाचित बाकीच्यांना आणखी चेव असावा. पेपरमधल्या बातम्या बघितल्या, तर त्यातही इतक्या सहज एखादी चांगली बातमी नाहीच सापडत! Depressing बातम्यांना मात्र उत आलेला असतो. म्हणजे मी का उघडावा पेपर? असा प्रश्न कोणालाच पडत नसेल? की आपल्याला तेच हवं असतं वाचायला?

असं तुम्हालाही नाही का वाटत की इतकं वाईट खरच झालं असेल का जग? काहीच चांगलं होत नसेल का आज काल? कोणालाच इच्छा होत नसेल का काहीतरी inspiring कीवा motivating सांगायची? ही कुठून घेतली आपण सवय? दुःख कुरवाळायची? गेले काही दिवस "आजकी २०० खबरे" असले बघायला मिळतंय news channel वर. त्या २०० पैकी एखादी तरी बातमी तुफान motivating असावी! की वाटावं, ये हुई न बात! चल आपणही असं काहीतरी करू! पण नाहीच होत च्यायला असं!

तसं सुखपण फारसं महाग नाहीचे? रेडिओवर बाई एक प्रश्न विचारते, जितका फालतू तितका चांगलं! म्हणजे "बे चा पाढा म्हणा" असेही असू शकतं. मग हजार call येतात. त्यात तुक्का बसतो एकाचा नि मग त्याला फुकट movie tickets मिळतात. लगेच तो lucky होतो. टाळ्या नि शिट्ट्या! सुख इतकं सोप्पही झालाय. तेही हेवा करावं असं सुख. कोणाला काही फुकट मिळाल की त्याचं उदात्तीकरण हमखास करतो आपण! टीवीवर फालतू प्रश्न सोडवून कीवा बऱ्याचद काहीही न करता झालेल्या lucky winner आपल्यासमोर goal देऊन जातात! म्हणजे फोन करत राहायचं! नंबर लागला की तुम्ही तुम्ही हिरो! काहीच नाहीतर, "च्यायला ते सगळे सुखी आहेत, मीच नाही!" हा आपलाच समज दृढ करायला ते पुरते. पुढे खूप वेळ आपण त्यांची चर्चाही करतो!

हे कुठेतरी काहीतरी चूक आहे हे आतून पण काळत असतच की. पण १० पैकी ८ लोक हे असेच करत असतील तर मी का मागे पडू? बहुमताकडे धावायची सवय नवीन नव्हे. म्हणून वेगळ चुकूनही नाही करत! सगळेच कुठेतरी इतके अगतिक झालेत की चुकून सहज असच मलापण lottery का लागावी ही प्रत्येकाची अशा आहे. आधी आशा होती, आता आग्रह आहे. कारण मला वाटतंय की मी सोडून बाकीच्या सगळ्यांना काही न काहीतरी फुकट मिळतंय! मग मलाच का नाही? तशा मलाही फुकट गोष्टी मिळत असतातच. पण ते आपल्याला मिळणं एकतर obvious असतं! किवा बाकीच्यांना आपल्याहून खूप जास्ती मिळत असतं, किवा आपल्याहून खूप जास्ती वेळा मिळत असतं! म्हणून It doesn't count! आणि या फुकट गोष्टी नाही मिळाल्यामुळे कदाचित हा राग! इतरांबद्दलचा! आणि त्यामुळं भूक कदाचित, आजू बाजूच्या खराब गोष्टी बघायची नी त्यातून आपलं frustration काढायची! हे सगळं असच असतं, हे आपल्या स्वतःच्याच मनावर नकळत बिंबवायची!

खरच काहीही नसेल चांगलं घडत जगात? मला नाही वाटत यार. असेल की काहीतरी. का कुठूनच पुढं येत नाही ते? का आपल्याला कोलाहल आवडतो? का नसलेल्या गोष्टींचे आकर्षण असते? कोणीतरी खडतर परिश्रम करून मोठं झालेला असेल, तर तो माणूस का आकर्षित करत नाही? "च्यायला मी कधी एवढं कष्ट करून काहीतरी मिळवणार?" असं वाटणारी वेडी माणसं कुठतरी असतीलच की? सत्यमेव जयतेच्या प्रत्येक भागात कोणी न कोणी inspiring आणलेलं. अशा माणसांचा उदो उदो करायला आपण कधी शिकणार? ही अशी उदाहरणं का विरून जातात? किती लोक आठवतात आपल्याला की जे सत्यमेव जयते मध्ये आले? ज्यांनी लोकांच्या हितासाठी खूप काही काही केलंय? का नाही देवी शेट्टी आठवत? का नाही विल्सन आठवत? का नाही आपण त्यांच्या तळमळीबद्दल दिवसेंदिवस बोलत? का नाही inspire होत? का या गोष्टी चार दिवसात विरून जातात आणि मग आपली नजर परत कोलाहालाकडे वळते? लोकांना जे बघायला आवडतं, ते आम्ही दाखवतो, छापतो! ही असली फालतू करणं आपण कधी सोडणार? Media वर ढकलायचं कधी सोडणार? किंवा आपल्याला कोणी न कोणीतरी लागतोच खापर फोडायला! अगदी कोणीच नाही सापडलं तर, Government आहेच! तसा government नेही स्टेटस maintain केला आहेच. पण आपल्या या desperate वागण्याला उत्तर काय? घडलेल्या प्रत्येक घटनेचं खापर फोडायला असे काही desperate व्हायचं की ते केलं नाही की मला कदाचित स्वतःकडे बघायची वेळ येईल हि भीती अंतर्मुख व्हायची वेळ येईल. मग उत्तरंच मिळायची बंद झाली तर? लोक आपल्याला जसे समजतात ते आपण आणि खरे आपण यातला फरक समोर आला तर? आणि सगळ्यात शेवटी काहीतरी action करायची जबाबदारी आपल्यावरच आली तर? मग खापर कोणावर फोडणार? मग त्याच्याशी कसे deal करणार?

शेवटी बोलाचीच कढी, आणि बोलाचाच भात. कंटाळा आला यार! खरच काहीतरी करुया. जमत नसेल तर प्रयत्न तरी करू. दुसऱ्यावर नको ढकलूया! मेणबत्त्या पकडणाऱ्या हातानी जरा डोकंपण खाजावूया. शोधून काढूया, की आपण स्वतः काय करू शकतो.